palak lagwad / पालक लागवड ही जमीनिसाठी आरोग्यदायक ठरते !
पालक भाजीमध्ये अ आणि क जीवनसत्व जास्त असतात .

पालक लागवड भारतातील जवळपास सर्वच राज्यात लागवड केली जाते . पालकाच्या उत्कृष्ट आणि स्वादिष्ट पानांमुळे पालक ला वर्षभर प्रचंड मागणी असते परंतु पालक पिकाची लागवड मुख्यतः खरीप व रब्बी हंगाम मध्ये केली जाते तसेच उन्हाळा हंगामामध्ये पालक पिकाची उत्पादन जरी कमी असेल तरी मागणी मात्र प्रचंड असते.
म्हणून पालक लागवडीला प्रचंड भाव आहे. पालक पीक हे रोजच्या आहारामध्ये वापरली जाणारी महत्त्वाची पालेभाजी पीक आहे . पालक चे विशिष्ट स्वाद युक्त पाने भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरतात . मुख्यतः माणसं आणि सोबत शाकाहारी पदाचा मध्ये देखील पालक चा वापर करण्यात येतो. पालक च्या वड्या तर प्रत्येकाच्या आवडीचे आहेत.
पालक पिकाची लागवड कुठल्याही प्रकारच्या हवामानामध्ये करता येते. अति पावसा प्रदेश सोडून महाराष्ट्रामधील हवामानामध्ये वर्षभर पालक पिकाची लागवड केली जाऊ शकते. उन्हाळ्यामध्ये तापमान 36 डिग्री सेल्सिअस यावर गेले तर पालक पिकाची वाढ कमी होत असते .
पालक पिकाकरिता मध्यम आणि करता तसेच मध्यम खोल जमीन निवडावे सेंद्रिय खतांनी समृद्ध असणारी जमीन असल्यास हलक्या अथवा भारी जमिनीमध्ये पालकचे पीक चांगले येत असते.
पालक लागवड सुधारित जाती :
- पुसा ज्योती.
- पुसा हरित.
- पुसा भारती.
पालक लागवड साठी जमीन कशी असावी :
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,
त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.
पालक लागवड कधी करावी :
पालक लागवड ही पावसाळा किंवा उन्हाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून, किंवा रोप तयार करून लागवड करू शकतात.
लागवडीची वेळ : पावसाळा मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोंबर आणि उन्हाळा मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी.
पिकाची ची सुरुवात ही हिवाळा सुरू झाल्यावर सप्टेंबर ते ऑक्टोंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.
पालक लागवड पूर्व मशागत कशी करावी :
मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नागरून आणि कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. गुळव्याध च्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी तीस ते पन्नास गाड्या शेणखत जमिनीत पसरून मिसळून द्यावे.
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे रोप तयार करून आणि दूसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट बियाणे शेतात लावणे.
बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते
पालक लागवड बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी 5 ते 6 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 1 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.
त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
पालक लागवड पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
पेरणी अंतर आणि खोली::
पीक लागवड करताना 5 ते 10 cm अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.
पालक लागवड पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
तूर
मुंग
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला

आंतरमशागत ::
पालक लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .
जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
लागवडीचा हंगाम :
पालक लागवड तीनही हंगामात करता येते. खरीप बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि लागवड जुलै ऑगस्ट मध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगाम बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावतात. उन्हाळी हंगाम बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात फिरून लागवड फेब्रुवारीमध्ये सुद्धा करावी.
शेती पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते .
जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.साधारण खडकाळ मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
खते कोणती वापरावी :
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते,
त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा. पालक कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी. हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत.
कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.
रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या. पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.
शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी. काहीतणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येते. पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुहा आणि पालेभाज्यामध्ये मेथी कोथिंबीर घेता येतात.
कीड :
पालक लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे भुरी रोग , मावा आणि अळी. कीटकनाशक फवारणी करावी.
कीड व रोग :
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कीटकनाशके कोणती वापरावी : खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके अळी किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1) insecticide
2) herbicide.
काढणी आणि मळणी :
लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 1 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
उत्पादन : पालक चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति एकर 3 ते 5 टन होऊ शकते.
बाजार भाव :
बाजारभाव मार्केट नुसार बदल होत राहतात.
FAQ :::
1) पालक लागवड शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर = पालक चे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.
2) पालक हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = पालक पीक हे 25 ते 30 दिवसाचे आहे.
click here for video ; https://youtu.be/Dchmn2GpJVI?si=57mLTV_ZU1LJ3E-J
शिमला मिरची लागवड ; https://amchisheti.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1/#more-464