kanda lagwad / कांदा लागवड साठी थंड हवामान उपयुक्त
kanda lagwad / कांदा लागवड नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त दिसून येते .

कांदा हे सर्वात महत्त्वाचे पीक असून भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर खूप जास्त केला जातो. कांदा पिकवणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे आणि महाराष्ट्रामध्ये अंदाजे एक लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रामध्ये नाशिक ,पुणे, सोलापूर, जळगाव ,धुळे अहमदनगर, सातारा हे जिल्हे हेक्टरी कांदा पिकवण्याबाबत प्रसिद्ध आहेत तसेच मराठवाड्यामध्ये संभाजीनगर ,जालना आणि विदर्भ व कोकणात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते.
नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात कांदा पिकवण्यामध्ये प्रसिद्ध आहे एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37% तर भारतातील दहा टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जात आहे.
कांदा लागवड साठी हवामान :
कांदा हा हेक्टरी हिवाळी हंगामातील पीक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची दोन ते तीन पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून एक ते दोन महिने हवामान थंड लागते आणि कांदा पुसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त ठरते.
कांदा लागवड साठी जमीन कशी असावी :
पाण्याचा निचरा असणारी भुसभुशीत जमीन व सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमीन कांद्याला चांगली मानवते.
कांदा लागवड पूर्व मशागत :
जमिनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी आणि जमिनीत हेक्टरी 40 ते 50 टन शिलकत मिसळावे.लागवडी पूर्वज जमिनीची दोन ते तीन वेळा खोलवर नागरट दोन ते तीन वेळा फणनी करून धसकटे व हरळीच्या काशा वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी.
त्यानंतर हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून 50 किलो नत्र 200 किलो स्फुरद व दोनशे किलो पलाश लागवडी पूर्वी जमिनीमध्ये पूर्णपणे मिसळून घ्यावे. व नंतर सात सेंटीमीटर अंतरावर सरीवरंबी तयार करून घ्यावेत व त्यानंतर सर्वांची नाके तोडून पाणी सोयीप्रमाणे वाफे करून द्यावेत.
कांदा लागवड हंगाम :
महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोंबर आणि रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात.
कांद्याचे वाण :
1) बसवंत 78 : खरीप व रब्बी हंगामासाठी ही जात योग्य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्यम महिन्यात ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते आणि हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
2) एन 53 : ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे. 100 ते 150 दिवसात तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो आणि हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल मिळते.
3) एन 241 : ही जात रब्बी हंगामासाठी योग्य असून रंग भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्यम गोल असून साठवणुकीत हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे टिकतो. ही जात १२० ते १३० दिवसात तयार होते आणि हेक्टरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल मिळू शकते.
4) पुसा रेड : कांदे मध्यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्यम तिखट असतात. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतात आणि हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
कांदा लागवड बियाण्याचे प्रमाण :
कांदा लागवडीसाठी बियाण्याचे प्रमाण हेक्टरी दहा किलो बियाणे पुरेसे असते.

कांदा लागवड कशी करावी :
कांदा लागवड करताना कांद्याची रोपे ,गादीवाफे तयार करणाऱ्या क्षेत्राची खोल नागरट करून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
गादी वाफा एक मीटर रुंद तीन मीटर लांब आणि पंधरा सेंटीमीटर उंच करावा.
वाफ्यातील ढेकळे निवडून बाजूला काढावेत. वाफ्याच्या रुंदीशी समांतर अशा पाच सेंटीमीटर बोटाने रेषा पाडाव्यात आणि या बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे.
बी उगवून येईल पर्यंत झाऱ्याने पाणी घालावे.
बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. फुलकिडे व करपा यांच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायन एम 45 तसेच 50 ग्रॅम युरिया व दहा मिली sadovit यासारखी चिकट द्रव्य मिसळून दर दहा दिवसाच्या अंतराने चार ते पाच फवारण्या कराव्यात.
रोपांना गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्य समजावे. खरीप कांद्याची रोपे सहा ते सात आठवड्यांनी व रब्बीची आठ ते नऊ आठवड्यांनी तयार होतात. रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर गादीवाफ्यास पुरेसे पाणी द्यावे त्यानंतर कांद्याची लागवड गादीवाफ्यावर तसेच सरीवर करून घ्यावी.
सपाट वाफ्यामध्ये हेक्टरी रोपांचे प्रमाण जास्त असले तरी मध्यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्पादन मिळते. सपाट वाफा दोन मीटर रुंद व उताराप्रमाणे वाफ्याची लांबी ठेवावी. रोपांची लागवड सकाळी अथवा संध्याकाळी करावी. रोपांची लागवड १२.५ बाय ७.५ सेंटीमीटर अंतरावर करावी त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
कांदा लागवड साठी खते व पाणी व्यवस्थापन :
कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद व पन्नास किलो पलाश लागवडीच्या वेळी द्यावे त्यानंतर एका महिन्याने पन्नास किलो नत्र प्रती हेक्टरी द्यावी .पिकासाठी प्रती हेक्टरी 20 किलो नत्र 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश लागण्याच्या वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्ता 20 किलो या प्रमाणात फुले दिसायच्या वेळेस किंवा पिकासाठी प्रती हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व नत्राचा 25 ते 30 किलो चा दुसरा हप्ता एका महिन्याने द्यावा.
बागायती पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी. हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत. कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.
रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या.पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.
शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी. काहीतणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येते.
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा. काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
कांदा लागवड पाणी व्यवस्थापन :
कांदा पिकाला नियमित पाणी दिले महत्त्वाचे असते. खरीप हंगामात दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात सहा ते आठ दिवसांनी जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाणी द्यावे.

कांदा लागवड अंतर मशागत :
रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे अगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो.झाडाभोवतालचे तन काढून स्वच्छता ठेवावी आणि जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी.
दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा तसेच तारांवर सुद्धा वेली पसरून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो. पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो
रोग व किड :
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कांद्यावर प्रामुख्याने करपा हा रोग बुरशीपासून होतो त्यामध्ये पाठीवर लांबट गोल तांबूस चट्टे पडतात.
शेंड्यापासून पाणी जळाल्यासारखे दिसतात.
खरीप कांद्यावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
फुलकिडे किंवा अळ्या हेक्टरी अगदी लहान आकाराचे कीटक पातळीवरील तेलकट पृष्ठभागात दिसून येतात व त्यात स्त्रवणारा रस शोषून घेतात त्यामुळे पाठीवर पांढरे ठिपके पडतात.
उपाय : फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 2,3 आठवड्याने प्रतिहेक्टरी फॉस्फोमिडोंन 85 डब्ल्यू एस सी शंभर मिली किंवा क्वीनलफॉस 25 ६०० मिली आणि त्यासोबत डायथेनियम 45 , अधिक 1000 ग्रॅम sadovit चिकट द्रव्य 500 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी.
पहिल्या फवारणीनंतर तीन चार आठवड्यांनी दुसरी फवारणी करावी.
काढणी व उत्पादन :
कांद्याचे पीक लागवडीनंतर तीन ते साडेचार महिन्यात काढणीस तयार होते. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते यालाच मान मोडणे असे म्हणतात. साठ ते सत्तर टक्के माना मोडल्यावर कांदा काढणीस पक्व झाला असे समजावे आणि कांदा काढणीस तयारी करावे.
कुदळीच्या साह्याने आजूबाजूची जमीन सेल करून कांदे उपटून काढावेत. कांदा काढणीनंतर चार-पाच दिवसांनी कांदा पातीसगट शेतात लहान लहान ढिगा करून ठेवावा नंतर कांद्याची पात व मळे कापावे पात कापताना तीन ते चार सेंटीमीटर लांबीचा देठ ठेवून पात कापावी.
यानंतर चार ते पाच दिवस सावलीत सुखवावा.
कांद्याचे हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
click here for video ; https://youtu.be/UmUzOhHjhiM?si=XCzR6fXH0tzKuYdW
ड्रॅगन फळ लागवड ; https://amchisheti.com/dragon-fruit-lagwad/#more-583