हरभरा लागवड ( harbhara lagwad ) भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे असे दिसून येते .
हरभरा चे टॉप वाण ; विजय ,विराट , दिग्विजय आणि विशाल .

रब्बी हंगामा मधे हरभरा ही महत्त्वाची पिके घेतली जाते हरभरा हे 110 ते 120 दिवसात येणार पीक असून थोडासा पावसाचा देखील लाभ उठू शकते दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी हरभरा आणि तूर हे अतिशय महत्त्वाची पिके आहेत. या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगली निजरा होणारी जमीन आवश्यक असते पाणी साचून राहणारी क्षारपड चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी.
जमीन नागरावी ती चांगली खूप तापू द्यावी आणि हिवाळा सुरू होताच कुळाच्या पाळ्या मारून सपाट करावे तस्करी वेचून घ्यावीत याचवेळी हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
रब्बी हंगामात पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून हरभरा या पिकाला प्राधान्य दिले जाते. वर्षभर तीनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या या पिकांची रब्बीत 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशिरा सुरू झाल्यास किंवा रब्बी पिकाशी दुबार पेरणी झाल्यास मसूर पीक घेण्याचा विचार केल्यास पीक वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो.
देशात बिहार ,पंजाब , ओडिसा, महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात शेती करतात.
लागवड करण्यापूर्वी :
या शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये येणारे पीक म्हणजे हरभरा.
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये या पिकाची लागवड करू शकतात.
शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते ,कमी पाण्यात पण हरभरा लागवड successful ठरते
माती ची pH level 6 असावी
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी पद्धतीने 70 ते 85 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये हरभरा ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
या पिकाची लागवड शेतकरी अशा प्रकारे करू शकतात , Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची
जमीन कशी असावी :
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,
त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.
लागवड कधी करावी :
हरभरा शेती ही हिवाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
लागवडीची वेळ : ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये
पिकाची ची सुरुवात ही हिवाळा सुरू झाल्यावर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.
लागवड पूर्व मशागत कशी करावी :
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे . बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही ,
बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.

हरभरा च्या सुधारित जाती :
हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे
- विजय
2.विशाल
3.दिग्विजय
4.विराट
बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी 70 ते 85 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 4 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.
त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर म्हणजे रब्बी हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.
हरभरा पेरणी करावी किंवा लावणी करावी हा प्रश्न शेतकरी लोकांना नेहमी पडत असतो हरभरा ची पेरणी केल्यावर झाडामध्ये अंतर जास्त ठेवावे .पण त्यापेक्षा हरभरा आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .म्हणून आपण 20 ते 30 cm अंतरावर हरभरा ची लावणी झाली पाहिजे . जास्त अंतरावर लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे पीक पण चांगले येते.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
पेरणी अंतर आणि खोली::
पीक लागवड करताना 22 ते 30 cm अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.
हरभरा पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
तूर
मुंग
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला
हरभरा आंतरमशागत ::
हरभरा लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
शेती पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते . जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.
हरभरा कमी पाण्यात जास्त पीक देणारी प्रजात आहे .आणि साधारण खडकाळ मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
खते कोणती वापरावी :
पिकाला दर हेक्टरी 80 किलो नत्र 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पलाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पलाची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. जमिनीच्या आत मध्ये 20 ते 30 गाड्या शेणखत जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळी मिसळून द्यावे.
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा.
कीड :
हरभरा लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे भुरी रोग आणि शेंग पोखरणारी अळी. कीटकनाशक फवारणी करावी.
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कीटकनाशके कोणती वापरावी : खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके अळी किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1) किनोल्फोल 35
2) ई सी 0.07
3) सुल्फेक्स 0.30
काढणी आणि मळणी :
लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 4 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
उत्पादन : हरभरा चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 15 ते 20 क्विंटल होऊ शकते
प्रति एकर 7 ते 8 क्विंटल होऊ शकते
बाजार भाव :
2023 मध्ये 7000 रुपये प्रति क्विंटल
2024 मध्ये 8000 रुपये प्रति क्विंटल
2025 मध्ये 10000 रुपये पेक्षा जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.
FAQ :::
1) हरभरा शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर = हरभरा चे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.
2) हरभरा हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = हरभरा पीक हे 110 ते 120 दिवसाचे आहे.
3) हरभरा मध्ये काय असते ?
उत्तर = प्रथिने

click here for video ;https://youtu.be/e_yxk89SZPY?si=cD9YlRnfAHhvjORB