Amla farming / आवळा लागवड माहिती ! 15 ते 20 टन उत्पन्न हेक्टरी !

आवळा ( amla ) लागवड जून ते जुलै महिन्यामध्ये करावी .

आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एन ए दहा व एन ए सात या जातींची शिफारस आहे.

आवळा लागवड

येत्या काळात आवळ्याला मोठी मागणी राहणार आहे हे लक्षात घेऊन तुम्ही आवळा शेतीचा विचार करू शकता आवळा शेतीसाठी कोणकोणते गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती आपण आज बघणार आहोत. औषधी आणि गुणकारी फळ म्हणून आवळा सगळ्यांना माहिती आहे.

आवळ्याचा उपयोग अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी मध्ये केला जातो आणि आवळ्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. कोरड्या उष्ण कटिबंधीय उष्ण आणि समशितोषण प्रकारच्या हवामानात आवळ्याची लागवड करता येते. विशेष करून आवळा लागवडीसाठी महाराष्ट्राचा हवामान पोषक आहे त्यामुळे कोणत्याही भागात आवळ्याची लागवड होऊ शकते आणि आवळा अत्यंत काटक असल्याने आवळ्याची लागवड कोरडवाहू आणि जिरायती जमिनीतही होते.
महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन एन ए दहा व एन ए सात या जातींची शिफारस आहे.

आवळ्याच्या बनारसी, चकया आणि देशी अशा जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. बनारसी जातीची फळे आकाराने मोठी पिवळसर आणि चमकदार असतात तर चकल्या जातीची फळे मध्यम आकाराची असून उत्पादन भरपूर मिळते तसेच फळाचा टिकाऊपणा जास्त असतो. देशी जातीची फळे आकाराने लहान असतात.


बनारसी जातीची फळे ,मोरावळा आणि रस करण्यासाठी आणि चकाया जातीची फळे कॅंडी, सुपारी, रस ,पावडर करण्यासाठी तर देशी जातीची फळे पावडर लोणची तयार करण्यासाठी वापरतात. कांचन जातीची फळे घरासाठी फायदेशीर ठरतात त्यामुळे लागवड करताना आवळ्याच्या तीन ते चार जातींची लागवड करणे फायदेशीर ठरत.

आवळा लागवड साठी जमीन कशी असावी :
आवळा लागवडीसाठी सुपीक चिकन मातीचे प्रमाण जास्त असलेले आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली मानली जाते. चुनखडी युक्त किंवा रेतार जमिनीत आवळ्याची लागवड शक्यतो टाळावी.


आवळ्याच्या बियांपासून तयार केलेली रोपे प्रामुख्याने रूट स्टॉक म्हणून कलमे तयार करण्यासाठी वापरली जातात. कारण बियांपासून तयार केलेल्या  रोपांपासून आकाराने छोटी, कमी दर्जाची आणि खूप कालावधीनंतर फळे मिळतात म्हणून व्यापारी दृष्ट्या लागवडीमध्ये ती वापरत नाहीत.


शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,

त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.

आवळा लागवड कधी करावी :

जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड केल्याने रोपांची उत्तम वाढ होते. लागवडीपूर्वी उभी आडवी खोल नांगरणी करून जमीन तयार करावे. 60 बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून प्रत्येक खड्ड्यात दहा ते पंधरा किलो कुजलेले शेणखत अडीचशे ग्रॅम निंबोळी खत आणि अडीचशे ग्रॅम सेंद्रिय खत मातीमध्ये मिसळून खड्डे भरून घ्यावेत. लागवड करताना परागीभवन आणि जास्तीत जास्त उत्पादनाच्या हेतूने 2:2:1 या गुणोत्तराचे किमान तीन जातींची लागवड करावी.


शेती  ही पावसाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
  लागवडीची वेळ : जुने ते जुलै  मध्ये
पिकाची ची सुरुवात ही पावसाळा सुरू झाल्यावर जुने ते जुलै या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.

आवळा लागवड पूर्व मशागत कशी करावी :

बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे .

बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.

आवळा लागवड साठीच्या सुधारित जाती :
  हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे 

  1. कृष्णा
  2. कांचन
  3. एन ए 10
  4. एन ए 7
    5.बनारसी
  5. चकय्या
  6. देशी.

आवळा लागवड बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर  लागवड करण्यासाठी 5 ते 6 किलो बियानाची गरज पडते.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते


आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.

आवळा लागवड पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही

तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.

आवळा लागवड पेरणी अंतर आणि खोली::

पीक लागवड करताना 10 ते 12 फूट अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.

amla

आवळा लागवड पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
टोमॅटो
वांगे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला

आवळा लागवड आंतरमशागत ::

आवळा लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे  पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .

जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.

आवळा लागवड पाणी व्यवस्थापन:

नवीन कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार प्रत्येक झाडाला वीस ते तीस लिटर पाणी दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने द्यावे. आंतरपीके घेतल्यास पाणी आणि खाते देण्याची विशेष गरज लागत नाही. जुलै महिन्यामध्ये पूर्ण शेणखत आणि अर्धी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

अर्धी रासायनिक खतांची मात्रा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचा अंदाज घेऊन द्यावी. खतांचा वापर केल्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा पाणी दिले जाते. फुलदाणीच्या काळात म्हणजेच मार्च एप्रिल दरम्यान पाणी तोडावे. फळ गळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे.


शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण  पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते . जास्त पाणी दिल्यास  झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .

खते कोणती वापरावी :

सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .


आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी


परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर  शेती साठी करावा.

आवळा लागवड तोडणीचा हंगाम :

कलमे केलेली झाडे लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून फळे देण्यास सुरुवात करतात तर बियांपासून लागवड केलेल्या झाडांना सहा ते आठ वर्षे लागतात. आवळ्याला मार्च एप्रिल महिन्यात फुले येतात फुल ते परिपक्व फळासाठी सामान्यपणे पाच ते सहा महिने लागतात.

फळधारणा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करू नये. मृगाचा पाऊस पडल्यानंतर फळाची वाढ होण्यास सुरुवात होते. तोडणीचा हंगाम जातीनुसार सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत चालतो. चांगली तयार झालेली फळे काढावीत आणि फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढून काढावी लागतात. तोडणीच्या विलंबामुळे काही जातीच्या बाबतीत फळे मोठ्या प्रमाणात गळतात. तोडणी सहसा दिवसाच्या लवकर किंवा उशिरा करावी व पूर्ण वाढलेल्या दहा वर्षांपूर्वी धडापासून शंभर ते एकशे वीस किलो फळे मिळतात.

हेक्टरी 15 ते 20 टन उत्पादन होऊ शकते.
आकारानुसार फळांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. मोठ्या आकारांची फळे मुख्यतः कॅन्डी साठी वापरतात. लहान आकारांची फळे चवनप्राश आणि त्रिफळा चूर्ण तयार करण्यासाठी वापरतात. उरलेली फळे पावडर आणि शाम्पू बनवण्यासाठी वापरतात. त्यामुळे मागणी असलेली प्रक्रिया प्रक्रिया उद्योग बचत गटांची माहिती गोळा करून तुम्ही आवळ्याची विक्री तेथे करू शकता याशिवाय आवळा शेती सोबतच तुम्ही आवळा प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करून अजून चांगला नफा किंवा फायदा मिळू शकतात.

कीड :
यावर पानावरचे ठिपके , भुरी,केवडा हे रोग येण्याची शक्यता असते आणि फुल किडे, मावा, पांढरी माशी, नागअळी ,फळमाशी हे कीड पडण्याची शक्यता असते या किडींच्या नियंत्रणासाठी दहा मिली कार्बोसेफोन दहा लिटर पाण्यातून फवारावे व चार टक्के निंबोळी अर्क फवारावा.

बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.


यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उत्पादन  :  आवळा चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 15 ते 20 टन होऊ शकते
प्रति एकर  8 ते 12 टन होऊ शकते.

click here for video ; https://youtu.be/HfA6roXSr28?si=nHsg05iYgtgEfWyF

गुलाब लागवड ;https://amchisheti.com/%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1-rose-farming-80-export/#more-521