tomato lagwad / टोमॅटो लागवड साठी तापमान 18 ते 32 डिग्री मध्ये पाहिजे .
tomato lagwad / टोमॅटो लागवड तीनही हंगामात करता येते .

टोमॅटो लागवड जरी वर्षभर करता येत असेल तरी हवामानातील आणि तापमानाचा विचार करून पीक घ्यावे त्यामुळे उत्पादनात निश्चित वाढ दिसून येते. बियांची उगवण तसेच झाडांची वाढ 16 ते 29 डिग्री अंश सेल्सिअस तापमानात चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि फळधारणेसाठी 18 ते 32°c तापमान फारच उपयुक्त आहे. तापमान 32 अंश डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वर गेल्यास फळ धारणेवर खूप जास्त परिणाम होतात.
महाराष्ट्रामध्ये टोमॅटो लागवडीसाठी अंदाजे 30 हजार हेक्टर क्षेत्र आहे. नाशिक पुणे सातारा नगर नागपूर सांगली सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्त्वाचे जिल्हे आहेत आणि यामध्ये तीनही म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळी या हंगामामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आलेली आहे.
टोमॅटोमध्ये शीर संरक्षक अन्नघटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्त्व खूप महत्त्वाचे आहे. टोमॅटोमध्ये अ ब आणि क जीवनसत्वे तसेच खनिजे मध्ये लोह यासारखे अन्नद्रव्ये बघायला मिळतात.
टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागवडी योग्य असते त्यासोबत हलक्या जमिनीत फळे लवकर तयार होतात पाण्याचा निचरा चांगला होतो आणि पिकांची वाढ चांगली होते परंतु अशा जमिनीत सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा करावा लागतो. वारंवार पाणी देण्याची सोय असावी लागते.
टोमॅटो लागवड साठी जमीन कशी असावी :
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .
दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे , त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते .
टोमॅटोची सुधारित वाण :
महाराष्ट्रात लागवडीच्या दृष्टीने उपयुक्त टोमॅटोचे वान खालील प्रमाणे आहे.
1) पुसा रुबी : हा वांती नाही हंगामात घेता येतो लागवडीनंतर 45 ते 90 दिवसांनी फळे काढण्याचे दात आणि फळे मध्यम चपट्या आकाराची गरज लाल रंगाची असतात हेक्टरी उत्पादन 325 क्विंटल होऊ शकते.
2) पुसा गौरव : ही जात झुडूप वजा वाढणारे आहे यामध्ये फळे लांबट गोल पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची दिसतात वाहतुकीस योग्य आहे हेक्टरी उत्पादन 400 क्विंटल होऊ शकते.
3) पुसा शितल : हा वान हिवाळी हंगामासाठी लागवडीत योग्य आहे याची फळे चपटी को लाल रंगाची असतात हेक्टरी उत्पादन 350 क्विंटरपर्यंत होऊ शकते.
4) अरेका गौरव : फळ गळत लाल रंगाचे असते व टिकाऊ असते हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल पर्यंत असते.
5) रोमा : हा वाहन लहान व झाडपाळ असून फळे आकाराने लांबट व जाड साल असल्याने वाहतुकीस योग्य आहे हे तरी उत्पादन 25 टन मिळते.
त्याचबरोबर रूपाली, वैशाली ,भाग्यश्री ,अलका ,विकास पुसा हरली, डवार या जातींची लागवड केली जात आहे

टोमॅटो लागवड कधी करावी : रोपे तयार करण्यासाठी बियांची पेरणी गादीवाफ्यावर करावी आणि गादीवाफा तयार करण्यापूर्वी जमिनीची खोल नागरट करून दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. एक मीटर रुंद आणि तीन मीटर लांब व 15 सेंटीमीटर उंच असा गादीवाफा असावा.
पेरणीपूर्वी बियाणास तीन ग्राम थायरम बुरशीनाशक औषध सोळावे बियांची पेरणी हे वाफ यांच्या रुंदी समांतर बोटांनी रेघा ओढून त्यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे. वाफ्यांना झारीने पाणी द्यावे आणि बी उगवून झाल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी दोन ओळीत काकडी पाडून प्रति वापस दहा ग्रॅम फोरेट द्यावे वापी हे तनविरहित ठेवावेत म्हणजे त्यातले गवत काढून टाकावे.
फुलखेडे व कर पारोगांच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात बारा ते पंधरा मिलिग्रॅम डायथेम 45 फवारावे. रोपे उपटण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे त्यामुळे रूपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्ध होतात रोपांची पूर्ण लागवड नेहमी संध्याकाळी किंवा ऊन कमी झाल्यावर करावी.
हे पीक पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून, किंवा रोप तयार करून लागवड करू शकतात.
लागवडीची वेळ : पावसाळा मध्ये जून ते जुलै आणि उन्हाळा मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी.
पिकाची ची सुरुवात ही हिवाळा सुरू झाल्यावर सप्टेंबर ते ऑक्टोंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.
टोमॅटो लागवड पूर्व मशागत कशी करावी :
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे रोप तयार करून आणि दूसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट बियाणे शेतात लावणे.
बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते
टोमॅटो लागवड बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर काकडी लागवड करण्यासाठी 400 ते 500 ग्रम बियानाची गरज पडते आणि बियाणे लावल्यानंतर 2 महिन्यानंतर ची पहिली पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.
त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
टोमॅटो लागवड पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
टोमॅटो लागवड आंतरमशागत ::
झाडाभोवतालचे तन काढून स्वच्छता ठेवावी आणि जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी. दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा तसेच तारांवर सुद्धा वेली पसरून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो.
पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
टोमॅटो लागवड पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते .
जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.साधारण खडकाळ मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
टोमॅटो लागवड साठी खते कोणती वापरावी :
पिकासाठी प्रती हेक्टरी 20 किलो नत्र 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश लागण्याच्या वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्ता 20 किलो या प्रमाणात फुले दिसायच्या वेळेस किंवा पिकासाठी प्रती हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व नत्राचा 25 ते 30 किलो चा दुसरा हप्ता एका महिन्याने द्यावा.
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते,
त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा. काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
कीड : करपा हा रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो आणि रोगांमध्ये पाणी देठ खोड यावर तपकिरी गुलाबी ठिपके पडतात. यासाठी उपाय म्हणून डायथेम एम 45 हे दहा लिटर पाण्यात 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारावे आणि फवारणी दर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.
लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे करपा, मावा आणि अळी. कीटकनाशक फवारणी करावी.
या पिकांवर प्रामुख्याने केवडा व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डीनो कॅप 1मिली . एक लिटर पाण्यातून फवारावे तसेच केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन झेड 78 हेक्टरी औषध दहा ग्रॅम दहा लिटर पाण्यातून फवारावे.
या पिकांवर प्रामुख्याने तांबडे भंगीरे फळमाशी व मावा या किडींचा प्रादुर्भाव होतो . पाणी खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायजोपास दोन मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. फळ माशीच्या नियंत्रणासाठी मिलाथीऑन टू मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

टोमॅटो लागवड काढणी आणि मळणी :
टोमॅटो लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 3 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
उत्पादन : हेक्टरी 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळते.
टोमॅटो लागवड click here for video ; https://youtu.be/N9097HIbYsE?si=Qvbu98OlMP8gkKz9