वांगी लागवड माहिती / vangi lagwad mahiti ! 3 महीने कालावधी !

वांगी लागवड ( vangi lagwad ) साठी 13 ते 21 सेल्सिअस तापमान योग्य .

वांगी लागवड ( vangi lagwad ) तिन्ही हंगामात करता येते .

vangi lagwad

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. आहारात वांग्याची भाजी भरीत वांग्याची भाजी इत्यादी अनेक प्रकारे यांचा उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्या लोकांना गुणकारी ठरतात.

वांग्यामध्ये खनिजे व जीवनसत्वे तसेच लोह प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात या पिकाखाली अंदाजे 29 हजार हेक्टरी क्षेत्र लागवडीखाली आहे.

वांगी लागवड साठी हवामान :
कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस वांगी पिकाला मानवत नाही. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानाला वांग्याचे पीक चांगले येते.

वांगी लागवड जमीन :
सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत वांग्याचे पीक घेता येते परंतु सुपीक चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते. जमिनीचा सामू सहा ते सात असल्यास पिकाची वाट चांगली होते आणि नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याची उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे.

शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,

त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.

वांगी लागवड करण्यापूर्वी :

या शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या मध्यम माती मध्ये येणारे पीक .
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये या पिकाची लागवड करू शकतात.


शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते ,कमी पाण्यात पण चवळी लागवड successful ठरते
माती ची pH level 6 असावी
या पिकाची लागवड शेतकरी अशा प्रकारे करू शकतात , Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची

वांगी लागवड पूर्व मशागत :
मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नागरून आणि कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. गुळव्याध च्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी तीस ते पन्नास गाड्या शेणखत जमिनीत पसरून मिसळून द्यावे.

बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे .

बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.

वांगी लागवडीचा हंगाम :
वांग्याची लागवड तीनही हंगामात करता येते. खरीप बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै ऑगस्ट मध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगाम बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावतात. उन्हाळी हंगाम बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात फिरून रोपांची लागवड फेब्रुवारीमध्ये करावी.

वाण :
मांजरी गोटा : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्यम आकाराची असतात. खोड पाने आणि फळांच्या देठावर काटे असतात. फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळांचा आकार मध्य महिन्यात गोल असतो.

या जातीची फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर चार ते पाच दिवस टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्पादन 300 ते 400 क्विंटल होऊ शकते.

वैशाली : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि फळांच्या देठावर काटे असतात. फळे आणि फुले झुमक्यांनी येतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे मिसळ पट्टे असतात. फळे मध्यम आकाराची अंडाकृती असतात. सरासरी हेक्टरी उत्पादन 300 क्विंटल होऊ शकते.

प्रगती : या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्या रंगाची असतात. पाणी फळे आणि फांद्यांवर काटे असतात आणि या जातीचे फुले आणि फळे झुमक्यांनी येतात.

फळे अंडाकृती आकाराची असून फळाचा रंग आकर्षक जांभळा असून पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात व पिकाचा कालावधी 175 दिवस असून बारा ते पंधरा तोडे मिळतात. हेक्‍टरी सरासरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल होऊ शकते.

अरुणा : या जातीची झाडे मध्यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुमक्यात लागतात आणि फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो.

हेक्टरी सरासरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल वांग्याच्या वरील जाती शिवाय कृष्णा एमएचबी दहा या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती आहेत.

बियांचे प्रमाण :
500 ग्रॅम पर हेक्टरी सुधारित जातींसाठी तर 150 ग्रॅम पर हेक्टरी संकरित जातीसाठी बियाणे लागू शकते.
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर  लागवड करण्यासाठी 500 ग्राम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 2 महिन्यानंतर ची पहिली काडणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस ,

आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .


बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.

लागवड कशी करावी :
वाघ्यांची रोपे गादीवाफ्यावर तयार करतात. गादीवाफे तीन बाय एक मीटर आकाराचे आणि दहा ते पंधरा सेंटीमीटर उंचीचे असावेत. गादीवाफ्याभोवती पाणी देण्यासाठी सरी ठेवावी. एक हेक्टर वांगी लागवडीसाठी अशा 15 ते 20 वाफ्यातील रोपे पुरेशी होतात. वांग्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी 400 ते 500 ग्रॅम बी पुरते.

वांग्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी 800 ते 1000 ग्रॅम बी पेरून अधिक रुपये तयार करून ठेवावेत. काही रोप न जगल्यास हे रोप नागे भरण्यासाठी वापरले येतात. गादीवाफ्यावरील रोपे बारा ते पंधरा सेंटीमीटर उंचीची झाल्यावर म्हणजे सहा ते आठ पानांवर आल्यावर लावणी तयार होतात.


लागवडीनंतर रूपांवर पाणी लहान होणे किंवा बोकड्या या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपवाटिकेमध्ये वाफ्यांवर बी पेरताना फोरेट दहा टक्के दाणेदार औषध तीन बाय एक मीटर आकाराच्या वाफ्यासाठी वीज ग्राम या प्रमाणात बियाण्याच्या दोन ओळींमध्ये टाकावे.

रूपांवरील मावा तुडतुडे फुल किडे या किडींच्या नियंत्रणासाठी बी पेरल्यानंतर दोन आठवड्यांनी बारा लिटर इंडोसल्फान हे वीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दोन ओळीतील आणि दोन रूपांतील अंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि जातीनुसार ठेवावे.

चांगल्या जमिनीमध्ये 100 बाय 100 सेंटीमीटर मध्यम प्रतीच्या जमिनीत 75 बाय 75 सेंटीमीटर आणि हलक्या जमिनीत 60 बाय साठ अंतर ठेवावे. रोपांची लागवड करण्यासाठी सरीवर अंबे पाडून वरंब्याच्या बगलेत एका जागी रोप लावावे. कोरडवाहू पिकांसाठी रोपांची लागवड सपाट जमिनीवर करावी.

रोपांची लागवड ढगाळ वातावरणात किंवा रिमझिम पाऊस सुरू असताना केल्यास फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी चार नंतर ऊन कमी झाल्यावर करावी.

खत आणि पाणी व्यवस्थापन :
वांग्याच्या बागायती पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी.

हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत. वांग्याच्या कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.
रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो.

खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या. वांगी पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.


वांग्याच्या शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी. काहीतणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येते. वांगी पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुहा आणि पालेभाज्यामध्ये पालक मेथी कोथिंबीर घेता येतात.

पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.


आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .म्हणून आपण 20 ते 30 cm अंतरावर लावणी झाली पाहिजे . जास्त अंतरावर  लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे  पीक पण चांगले येते.


जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.

कीड व रोग :
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.


यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत.

चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.


यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्पादन :
रोप लावणी नंतर दहा ते बारा आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढवून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढावी. फार कोळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते. तसेच जुना फळ ही ग्राहकांच्या पसंतीला उतरत नाही आणि चार ते पाच दिवसाच्या अंतराने दहा ते बारा वेळा वांग्याची तोडणी करता येते. वांगी पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन 100 ते 250 क्विंटल पर्यंत जाऊ शकते. वांग्याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते.

click for video ; https://youtu.be/6fJlLI7LtUY?si=yKhHWYaSnuSCjavV

गवार लागवड माहिती ; https://amchisheti.com/gavar-lagwad-%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1-100-%e0%a4%a4%e0%a5%87-200-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%89/#more-719