लवंग लागवड माहिती / Lavang lagwad mahiti ! 4 वर्षा पासून फुले लागतात !

लवंग ( lavang ) पासून 15 ते 17 % तेल मिळते

लवंग हे उष्णकटिबंधातील झाड असून त्यात उष्ण दमट हवामान लागते.

लवंग लागवड

मसाले पिकामध्ये लवंग हे एक अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले किमती पीक आहे. भारतात प्रामुख्याने हे पीक केरळ तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. लवंगाचा उपयोग अन्नपदार्थांना स्वाद व सौ देण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या औद्योगिक उत्पादनात लवंग तेलाचा उपयोग केला जातो.

टूथपेस्ट, दात दुखी वरील औषधे ,पोटातील विकार त्यावर उपचार करण्यात आलेली औषधे तसेच उत्तम प्रतीची उत्तरे आणि सुवासिक साबण व व्हॅनिला तयार करण्यासाठी लवंग तेलाचा उपयोग केला जातो .
लवंगापासून 15 ते 17 टक्के तेल मिळते.

हवामानातील साम्यामुळे केरळ प्रमाणेच महाराष्ट्रातील कोकण विभागात या लागवडीस चांगलाच वाव आहे.
कोकण कृषी विद्यापीठाने विद्यापीठांतर्गत असणाऱ्या विविध संशोधन केंद्रावर लवंग ची लागवड केली आहे आणि त्यामध्ये पिकाची वाढ व उत्पन्न समाधानकारक असल्याचे दाखवून दिले जाते.

त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाबरोबरच कोकणातील जिल्हा परिषद शेतकऱ्यांना लवंग लागवडीसाठी उत्स्फूर्त करत आहेत आणि त्यासाठी लवंग रोपांचे वाटप केले जाते.


आपण मसाल्यात वापरतो ती लवंग म्हणजे लवंगाच्या झाडावरची कळी होय पूर्ण वाढलेल्या कळ्या काढून उन्हात वाळविल्या की लवंग तयार होते परंतु त्या तशाच वाळू दिल्यास त्यांचे फुलांमध्ये रूपांतर होते आणि नंतर फळात म्हणजेच एका कळीपासून एक लवंग किंवा एक फळ तयार होते.

हवामान व जमीन :
हे पीक उष्णकटिबंधातील झाड असून त्यात उष्ण दमट हवामान लागते. समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंची पर्यंत ते येऊ शकते आणि 20 ते 30 अंश डिग्री सेल्सिअस तापमान तर पंधराशे ते अडीच हजार मिमी पाऊस आणि 60 ते 95 टक्के आद्रता या पिकास चांगली मानवते.


प्रखर सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी व खोडावर करपण्याची क्रिया होऊन झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो म्हणून या पिकास सावलीची आवश्यकता असते. लवंगाचे पीक बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनीत येत असले तरी अधिक खोलीच्या उत्तम निजऱ्याच्या जमिनी चांगल्या असतात.

भारतात लवंगाची लागवड ज्या भागात मोठ्या प्रमाणात झालेली आहे तेथे जवळजवळ प्रत्येक महिन्यात पाऊस पडतो आणि तापमान साधारण असते.

त्यामुळे तेथे याची लागवड उघड्यावर केली जाते आणि पाणीपुरवठ्याची गरज भासत नाही. याउलट आपल्याकडे परिस्थिती आहे त्यामुळे लवंग झाडास ऊन व वाऱ्यापासून संरक्षण मिळू शकेल असे आदर्श ठिकाणी म्हणजे नारळ किंवा सुपारीचे बाग पूर्वेस उत्तर उतार असलेल्या डोंगर उतारावर तसेच दोन डोंगराच्या दरातील प्रदेशात पाणीपुरवठ्याची सोय असल्यास उघड्यावर देखील लवंगाची लागवड यशस्वी होते.

नारळ किंवा सुपारीच्या बागेत लवंगी लागवड करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणे आहे ते म्हणजे नारळ आणि सुपारीच्या झाडांमधील अंतर योग्य अंतरावर सुपारीची लागवड असेल अशा ठिकाणी हे आंतरपीक म्हणून घेता येते आणि चांगले उत्पन्न मिळते.

पूर्व मशागत :
योग्य अंतर ठेवलेल्या नारळ किंवा सुपारीच्या बागेत लागवड करावयाची असल्यास चार नारळ किंवा सुपारीच्या मध्यभागी लवंगचे रोप लावावे.

सुपारी बागेमध्ये मात्र नंतरचे रोप दोन चौकोन मोकळे सोडून तिसऱ्या लावावे. दोन डोंगराच्या दरीतील लागवड सहा ते सहा मीटर अंतरावर करावी.

निवडलेल्या जागी पंचेचाळीस सेंटीमीटर लांब रुंद व खोल खड्डे उन्हाळ्यात खोदावे. खड्ड्याच्या मातीतील दगड वेचून काढून मातीमध्ये दोन ते तीन टोपल्या शेणखत मिसळावे आणि खड्डा भरावा. खड्डा जमिनीपेक्षा थोडा अधिक उंच भरावा. समुद्रकिनाऱ्यावरील रिताड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या मातीत अर्धी तांबडी माती किंवा शक्य असेल तर गाळाची माती वापरावी.

लागवड कशी करावी :
लवंग ची लागवड कोणत्याही हंगामात केली तरी चालते. जोरदार पाऊस संपल्यानंतर लागवड करण्याचे फायद्याचे ठरते.

लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप वापरावे आणि अगोदरच भरून ठेवलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी रोपांच्या पिशवीच्या आकाराचा खंडा करावा आणि रोप असलेले प्लास्टिक पिशवी मातीत  फुटणार नाही अशा पद्धतीने काढून तयार केलेल्या खड्ड्यात रोप लावून  माती दाबून द्यावी.

खत व्यवस्थापन :
लवंगाच्या झाडास पहिल्या वर्षी दहा किलो शेणखत किंवा कंपोस्ट वीस ग्रॅम मात्र किंवा अठरा ग्रॅम स्फुरद हे द्यावे. ही मात्रा दरवर्षी प्रती एका झाडाला अशाच प्रमाणात ठेवावे व पंधरा वर्षानंतर प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत किंवा कंपोस्ट 300 ग्रॅम नत्र किंवा सहाशे ग्रॅम युरिया किंवा 250 ग्रॅम स्फुरद किंवा 750 ग्रॅम पलाश हे खते द्यावे.

ही खते दोन हप्त्यात द्यावी आणि लागवड केल्यानंतर तिसऱ्या महिन्यात खताचा पहिला हप्ता व दुसरा त्यानंतर सहा महिन्यांनी द्यावा. या पुढील वर्षापासून पहिला हप्ता पावसाळ्याच्या सुरुवातीस व दुसरा पावसाळ्याच्या शेवटी द्यावा.


सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .


आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते,

त्या नंतर त्याच खताचा वापर  शेती साठी करावा. काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.

अंतर मशागत :
पहिल्या वर्षी लवंगाच्या रोपांना सावलीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. लवंगाच्या झाडाला पाणीपुरवठा करताना जमीन सतत ओलसर राहील मात्र दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी. दलदली मुळे मरारोग येण्याची शक्यता .

असल्यामुळे ते टाळण्यासाठी एकाच वेळी खूप पाणी देण्यापेक्षा थोडे थोडे पाणी अनेक वेळा द्यावे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी रोपाभोवती 45 ते 60 सेंटिमीटर पर्यंत पाला पाचोळ्याचे आच्छादन ठेवावे.दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी. हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत. कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.


रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या. पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.


शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी. काहीतणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येते. पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुहा आणि पालेभाज्यामध्ये पालक मेथी कोथिंबीर घेता येतात.

काढणे व उत्पन्न :
लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप उपयोगात आणलेले असल्यास लागवड केल्यानंतर चार ते पाच वर्षात लवंगाच्या झाडास फुले येऊ लागतात.
फुले दोन हंगामात येतात.


फेब्रुवारी मार्च च्या दरम्यान पहिले व प्रमुख उत्पन्न मिळते तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात दुसरे व अल्प प्रमाणात उत्पन्न मिळते.
नवीन पालवीवर लवंगाच्या कळ्या येतात आणि कळीचा अंकुर दिसायला लागल्यापासून पाच ते सहा महिन्यात कळी काढण्यासाठी तयार होते. गुजराती सर्व कळ्या एकाच वेळी काढण्यासाठी तयार होत नाही.

तर कळ्यांचा घुमट पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारंगी रंग प्राप्त होतो अशाच कळ्यांची काढणी करावी आणि त्या उन्हात वाळू घालाव्यात. साधारणपणे चार ते पाच दिवसात कळ्या वाळतात. लवंगाच्या 15 ते 20 वर्षाच्या झाडापासून दोन ते तीन किलो वाळलेल्या लवंगा मिळतात.

रोगराई :
पान कुजने : रोपांना तसेच पूर्ण वाढलेल्या झाडांना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीस पानांच्या टोकावर व कडांवर काळसाठिपके किंवा चट्टे दिसून येतात. कालांतराने टोकाकडील भाग काळसर होतो किंवा पूर्ण पानस काळसर होते अशी पाने अकाली गळून पडतात.

टिक्का : या रोगामुळे कोवळ्या पानाच्या दोन्ही बाजूंवर तांबूस काळसर ठिपके निर्माण होतात. टिपके पसरत जाऊन आकाराने मोठे होतात. पान पिवळे होते आणि कालांतराने गळून पडते.

डायबॅक : रेताड व निकष तसेच कमी निचऱ्याच्या जमिनीत लागवड केलेल्या झाडांना हा रोग प्रामुख्याने होतो. तसेच पाणीपुरवठ्यात अनियमितपणा झाला तरी देखील हा रोग होतो. या रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांवरील फांद्या शेंड्याकडून जमिनीकडे वाळत जातात आणि कालांतराने संपूर्ण झाड वाढते. या रोगांचा प्रादुर्भाव उन्हाळा संपवण्याच्या व पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास विशेष जाणवतो. या रोगांवर पुढील प्रमाणे उपाययोजना करावी.

बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

झाडावर रोग होऊ नये म्हणून एक टक्का बोर्डो मिश्रणाच्या वर्षातून फवारण्या कराव्यात.
रोगांचा प्रादुर्भाव झालेली पाने व वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्या.
डायबॅक झालेल्या झाडांच्या आळ्यात वयोमानाप्रमाणे पाच ते दहा लिटर पाण्यात एक टक्का बोर्डो मिश्रण उतावे व पंधरा दिवसाच्या अंतराने एक टक्का बोर्डो मिश्रणच्या तीन फवारण्या कराव्या.

कीड :
पाने खाणारी अळी : ज्यावेळी झाडास नवीन पालवी येते त्यावेळी पाने खाणाऱ्या अळीचा उपद्रव आढळून येतो.
कोरड्या हंगामात या किडीचा उपद्रव अधिक होतो त्यामुळे नवीन पालवीचे अंकुर दिसून लागतात फवारणी करावी.

खोड अळी : अखंड काल्या रंगाची व पिवळट पट्टे असलेली केसाळ अळी फांद्या तसेच खोडांना भुके पाडून आत शिरते त्यामुळे फांद्यावर झाडे वाळतात.

click for video ; https://youtu.be/x3apESb-ZCM?si=3tQ_DLaSm1soS8hW

झेंडू लागवड ; https://amchisheti.com/%e0%a4%9d%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%82-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-zendu-lagwad-mahiti/#more-622